Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jun 23, 2013 - 20:00:36 PM


Title - सचखंड रेल्वेनेही परतले प्रवासी
Posted by : ConfirmTicket on Jun 23, 2013 - 20:00:36 PM

औरंगाबाद

उत्तराखंड येथील नैर्सगिक आपत्तीनंतर औरंगाबादचे अनेक प्रवाशी परतीच्या मार्गावर आहेत. शनिवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेसने दहा प्रवासी परत आले.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांमध्ये आनंद कुठे, वैशाली कुंठे, लक्ष्मीबाई कुंठे, अंजली कुंठे, ताराबाई सपकाळ, सुभाष गिरी, ममता गिरी, अनंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हे परत आले. परतलेल्या यात्रेकरूंमधील आनंद कुंठे म्हणाले, ' केदारना‌थ येथे शनिवारी दर्शन घेतल्यानंतर रात्री ८.३० वाजता गौरीकुंडावर आलो. त्याही वेळी पाऊस सुरूच होता. गौरीकुंडावरून रविवारी सकाळी ६.३० वाजता निघालो. गाडी स्टॅण्डवर आल्यानंतर गाडी घेऊन परतीच्या मार्गावर सोनप्रयागकडे निघालो. रामपुर येथे ट्रफिक ब्लॉक झाले होते. यामुळे आम्हाला पुढे जाता येईना. म्हणून १५ किलोमिटर पायी फाट्या पर्यंत चालत आलो. याठिकाणी एका जीपने गूप्तकाशीला आलो. गुप्त काशीहून ट्रव्हल्समधून हरिद्वारापर्यंत येण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागले. याठिकाणी हरिद्वाराहून आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीला आमची मदत डॉ. कानोहोरे यांनी केली.