Indian Railways News => Topic started by irmafia on Aug 02, 2013 - 06:00:07 AM


Title - रेल्वे ‘निर्धारित समय से लेट’
Posted by : irmafia on Aug 02, 2013 - 06:00:07 AM

नागपूर


देशाच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून, गुरुवारी अनेक गाड्या उशिराने धावल्या.

आज उशिरा आलेल्या गाड्या अशा : १२४१० निजामुद्दिन-रायगड १ तास २५ मिनिटे, १२७२४ एपी एक्स्प्रेस १ तास, १६०३२ जम्मुतावी-मद्रास एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, १८०३० हावडा-एलटीटी १ तास १५ मिनिटे, १२४२९ बंगलोर-निजामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस १ तास, १२७०८ हजरत निजामुद्दीन-तिरुपती संपर्कक्रांती एक्स्प्रेस ३ तास २५ मिनिटे, १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे.

बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रेल्वे स्थानकावर रुळांवर जवळपास दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे काल तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. करंट तिकीट कक्ष, लोहमार्ग पोलिस ठाणे, आरपीएफ ठाणे, हॉटेल कसमसन, रेल्वेचे उपाहारगृह जनाहार या सर्वच ठिकाणी पाणी घुसले होते. उपस्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयात गुडघाभर पाणी होते. मात्र, या कार्यालयातूनच येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची नोंद होत असल्याने येथील कर्मचारी पाण्यातच खुर्च्या टाकून बसले होते. रात्री १० च्या सुमारास रुळावरील पाणी ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.