Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 24, 2013 - 11:59:43 AM


Title - आवश्यकता असेल तरच बाहेर पडा!
Posted by : nikhilndls on Jul 24, 2013 - 11:59:43 AM

मुंबई

मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही चाकरमान्यांची दैना उडाली आहे. सकाळी वेळेवर धावणाऱ्या लोकल पावसाचा वेग वाढल्याने मंदावल्या आहेत. आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या किमान १० ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. पण रेल्वे सेवा सुरू आहे. रस्त्यांवर पावसाचं पाणी काही ठिकाणी साचू लागल्याने इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक मंदावली असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईत ऑफिसला वेळेवर जाण्यासाठी धावणाऱ्या चाकरमान्यांची दैना उडाली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, बोरीवली आणि वांद्रे या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, समुद्रात आज महिन्यातील सर्वात मोठी भरती आहे. दुपारी दिडच्या सुमारास चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे समुद्र किनारी जावू नये असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. शिवाय येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.