| Indian Railways News => | Topic started by RailXpert on Mar 13, 2013 - 12:00:04 PM |
Title - सकाळ - तिकिटांऐवजी पाणी तपासणीच जोरातPosted by : RailXpert on Mar 13, 2013 - 12:00:04 PM |
|
|
नाशिक - भीषण पाणीटंचाईमुळे रेल्वे प्रशासनाला पाण्याची काटकसर करणे अनिवार्य झाले आहे. सोबत एरवी विनातिकीट प्रवाशांची टेहळणी करणाऱ्या यंत्रणेवर रेल्वेस्थानकावरून पाणी नेणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईमुळे दोन महिने आधीपासूनच विनातिकीट प्रवाशांसोबतच पाण्याचे हंडे, भांडे घेऊन फिरणाऱ्यांच्या शोधाची वेळ आली आहे. |