Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 29, 2013 - 20:00:28 PM


Title - ...तरीही चाके थांबली - शकुंतला रेल्वे
Posted by : railgenie on Jul 29, 2013 - 20:00:28 PM

यवतमाळ ,

ब्रिटिशांच्या काळापासून रूळांवरून रूबाबदारपणे धावणारी शकुंतला रेल्वे आता विजनवासात गेली आहे. अतिवृष्टीचे कारण देत मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने यवतमाळ-मूर्तिजापूर मार्गावरील ही रेल्वेसेवा बंद केली आहे. मात्र हा रेल्वे मार्ग पूर्णपणे सुस्थितीत आहे. या मार्गाची देखरेख दारव्हा येथील इंजिनीअर व त्यांचे सहकारी करतात. त्यांच्याकडून हा मार्ग वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचा कोणताही अहवाल भुसावळ मंडळाला पाठविलेला नाही. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी मार्ग अयोग्य असल्याचे नमूद करीतच सेवा बंद केली आहे.

पूर्वी पावसामुळे अडाण नदीला पूर येत होता. त्यावेळी यवतमाळ-अकोला प्रवास करण्यासाठी शकुंतला नॅरोगेज रेल्वेच प्रवाशांसाठी आधार होती. त्यामुळे शकुंतलेच्या प्रवासी संख्येत सतत वाढच होत होती. अचानक रेल्वेने ही सेवा बंद केल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या सामान्यांची गैरसोय होणार आहे.

लोकप्रतिनिधींचे मौन

शकुंतला रेल्वेचा मार्ग ब्रॉडगेज व्हावा , यासाठी अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ , खासदार भावना गवळी प्रयत्नरत होते. खासदारांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव हे भुसावळ मंडळाचे रेल्वे सदस्य आहेत. मात्र या सर्वांना अंधारात ठेवत भुसावळ ‌मंडळाने ही सेवा बंद केली आहे.